तिसरे इंग्रज-मराठा युद्ध हेइ.स. १८१७-१८मध्येमराठे वइंग्रजांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्णभारतावर नियंत्रण मिळवले.
या आधी झालेल्यादुसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर मराठ्यांना आणि ब्रिटिशांना उसंत मिळाली. त्या दरम्यान ब्रिटिशांनी भारतातील स्वतःची शक्ती वाढवली परंतु मराठ्यांनी एकोपा टिकवला नाही आणि ते ब्रिटिशांच्या तुलनेत मराठे राजनैतिक आणि लष्करीदृष्ट्या कमी पडत गेले. अशा पार्श्वभूमीवरगव्हर्नर जनरललॉर्ड हेस्टिंग्सची नियुक्ती झाली.. त्याने आपल्या कारकिर्दीत आक्रमक धोरणाचा अवलंब केला.नेपाळ युद्धाच्या समाप्तीनंतरपेंढारी लोकांशी संघर्ष सुरू करून अप्रत्यक्षरीत्या मराठ्यांनाच आव्हान दिले. या व इतर अनेक कारणांमुळे इंग्रज आणि मराठ्यांमध्ये पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पडली. अखेर पेशव्याने अंतिम युद्ध करण्याचा निर्णय घेतला.त्याला अप्पासाहेब भोसले आणिमल्हारराव होळकर (यशवंतराव होळकरांचा पुत्र) यांनी साथ दिली.पण युद्धातपेशवा,भोसले आणिहोळकरांना एकत्र येऊ न देता त्यांना इंग्रजांनी वेगवेगळे पराभूत केले.सीताबर्डीच्या लढाईतभोसल्यांचा,महिदपुरच्या लढाईत होळकरांचा आणिखडकी,कोरेगाव वआष्टा येथील लढाईत पेशव्यांचा पराभव झाला. अशा प्रकारे एक एक करीत मराठे इंग्रजांसमोर हरले व सर्वांनी शरणागती पत्करली. हेस्टिंग्सने भोसले,पेशवाबाजीराव दुसरा आणिशिंदे यांना अपमानजनक तह स्वीकारण्यास भाग पडले. बाजीरावाला पेशवेपद सोडावे लागले आणि त्याचा प्रदेश इंग्रजांनी आपल्या साम्राज्यात विलीन केला. छत्रपतींचेसातारा राज्य व इतरमराठा सरदारांच्या प्रदेशावरब्रिटिश नियंत्रण प्रस्थापित झाले आणि खऱ्या अर्थानेमराठा सत्तेची समाप्ती झाली.
तिसरे इंग्रज-मराठा युद्ध हेइ.स. १८१७-१८मध्येमराठे वइंग्रजांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्णभारतावर नियंत्रण मिळवले.
या आधी झालेल्यादुसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर मराठ्यांना आणि ब्रिटिशांना उसंत मिळाली. त्या दरम्यान ब्रिटिशांनी भारतातील स्वतःची शक्ती वाढवली परंतु मराठ्यांनी एकोपा टिकवला नाही आणि ते ब्रिटिशांच्या तुलनेत मराठे राजनैतिक आणि लष्करीदृष्ट्या कमी पडत गेले. अशा पार्श्वभूमीवरगव्हर्नर जनरललॉर्ड हेस्टिंग्सची नियुक्ती झाली.. त्याने आपल्या कारकिर्दीत आक्रमक धोरणाचा अवलंब केला.नेपाळ युद्धाच्या समाप्तीनंतरपेंढारी लोकांशी संघर्ष सुरू करून अप्रत्यक्षरीत्या मराठ्यांनाच आव्हान दिले. या व इतर अनेक कारणांमुळे इंग्रज आणि मराठ्यांमध्ये पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पडली. अखेर पेशव्याने अंतिम युद्ध करण्याचा निर्णय घेतला.त्याला अप्पासाहेब भोसले आणिमल्हारराव होळकर (यशवंतराव होळकरांचा पुत्र) यांनी साथ दिली.पण युद्धातपेशवा,भोसले आणिहोळकरांना एकत्र येऊ न देता त्यांना इंग्रजांनी वेगवेगळे पराभूत केले.सीताबर्डीच्या लढाईतभोसल्यांचा,महिदपुरच्या लढाईत होळकरांचा आणिखडकी,कोरेगाव वआष्टा येथील लढाईत पेशव्यांचा पराभव झाला. अशा प्रकारे एक एक करीत मराठे इंग्रजांसमोर हरले व सर्वांनी शरणागती पत्करली. हेस्टिंग्सने भोसले,पेशवाबाजीराव दुसरा आणिशिंदे यांना अपमानजनक तह स्वीकारण्यास भाग पडले. बाजीरावाला पेशवेपद सोडावे लागले आणि त्याचा प्रदेश इंग्रजांनी आपल्या साम्राज्यात विलीन केला. छत्रपतींचेसातारा राज्य व इतरमराठा सरदारांच्या प्रदेशावरब्रिटिश नियंत्रण प्रस्थापित झाले आणि खऱ्या अर्थानेमराठा सत्तेची समाप्ती झाली.
फ्रान्सच्या रशियावरील आक्रमणास २४ जून १८१२ रोजी फ्रेंच सम्राटनेपोलियनच्या ग्रान्द आर्मीने रशियन सैन्यावर आक्रमण करण्यासाठी नेमान नदी ओलांडल्यावर प्रारंभ झाला. यातून रशियन सम्राटअलेक्झांडरने आपल्या हस्तकांमार्फतब्रिटनशी व्यापार करणे थांबवावे, जेणेकरून ब्रिटनला शांततेसाठी तह करणे भाग पडेल अशी नेपोलियनची मनीषा होती. या मोहिमेचे अधिकृत धोरण पोलंडला रशियाच्या धोक्यापासून वाचवणे हे होते. नेपोलियनने पोलंडच्या जनतेकडून पाठिंबा मिळवण्यासाठी या मोहिमेचे 'दुसरे पोलिश युद्ध' असे नामकरण केले. आता मात्र हे युद्ध फ्रान्समध्येरशियावरील मोहीम (फ्रेंच:Campagne de Russie) व रशियामध्ये१८१२ चेराष्ट्रभक्तिपर युद्ध (रशियन: Отечественная война 1812 года,Otechestvennaya Voyna 1812 Goda) या नावांनी ओळखले जाते.
ग्रान्द आर्मी ही ६,८०,००० सैनिकांची महाकाय फौज होती व त्यात ३,००,००० सैन्य फ्रेंच प्रांतांमधून आलेले होते. सैन्याची मोठी आगेकूच करून नेपोलियनने रशियन सैन्यास सामोरे जाण्यासाठी पश्चिम रशिया पादाक्रांत केला वस्मोलेन्स्क येथीललढाईत तसेच अन्य काही किरकोळ चकमकींत विजय मिळवले. स्मोलेन्स्कनंतर ही मोहीम संपेल अशी नेपोलियनला आशा होती परंतु रशियन सैन्याने शहरास आग लावून पूर्वेकडे पळ काढला. त्यामुळे स्मोलेन्स्क ताब्यात घेण्याचे नेपोलियनचे इरादे संपुष्टात आले व त्याला रशियनांचा ससैन्य पाठलाग करणे भाग पडले.
रशियन सैन्य माघार घेत असताना कॉसॅक लोकांवर गावे, शहरे व शेती जाळून नष्ट करण्याचे कार्य देण्यात आले जेणेकरून आक्रमकांना ताब्यात घेतलेल्या प्रदेशातून अन्नधान्य मिळू नये. या दग्धभू रणनीतीमुळे फ्रेंचांना मोठा धक्का बसला. आपल्याच प्रदेशाचा नाश करून आपल्याच लोकांना त्रास देण्याची रशियनांची मानसिकता त्यांना समजणे कठीण गेले. या कृतींमुळे फ्रेंचांना अन्नपुरवठा प्रणालीवर विसंबून रहावे लागले जी त्यांच्या फार मोठ्या सैन्यास अपुरी पडणारी होती. उपासमार व हलाखीच्या परिस्थितीम्ळे फ्रेंच सैनिक रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडू लागले. अशा सैनिकांना बऱ्याचदा जे त्यांना कैद किंवा ठार करत असत, अशा कॉसॅक टोळ्यांना सामोरे जावे लागे.
रशियन सैन्याने सलग तीन महिने रशियाच्या अंतर्भागात माघार घेतली. या सातत्यपूर्ण माघारीमुळे तसेच आपल्या जमिनी गेल्यामुळे रशियाचा उमराव वर्ग नाराज झाला. त्यांनी सम्राट अलेक्सांद्रला रशियन सैन्याचा सर्वोच्च सेनानी फील्ड मार्शल बार्क्ले याला हटवण्यास भाग पाडले तेव्हा सम्राटाने राजपुत्र मिखाईल कुटुझोव या अनुभवी सेनाधिकाऱ्यास नियुक्त केले. परंतु आपल्या पूर्वाधिकाऱ्याप्रमाणे कुटुझोवनेही आणखी दोन आठवडे माघार घेणे कायम ठेवले.
...की, मराठी २६ जानेवारी, २०२० रोजी मराठी विकिपीडियावर एकूण ८,०२३ चरित्रलेख होते. यांपैकी २,३२६ म्हणजेच २८% लेखस्त्री चरित्रलेख तर उर्वरितपुरुष चरित्रलेख होते? इंग्लिश विकिपीडियावर हे प्रमाण १८% आहे.
मराठी विकिपीडियाचीप्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. यासाठी पुढील काही गोष्टी आपण करु शकता:
"अलीकडील बदल" हे अतिशय लोकप्रियपान आहे. यापानावरील इतरांकडून होत असलेले बदल तुम्ही तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा किंवा लेखाचे स्वतःसंपादन करा.
येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर अनेक विकिपीडियन्स तयार करतात. यासाठी प्रत्येक महिन्याकरता एक विषयनिवडला जातो व त्या विषयावरील लेख मासिक सदर म्हणून प्रकाशित केला जातो. येत्या महिन्याच्या मासिक सदरासाठीयेथे नामनिर्देशन करा.
विकिपीडिया प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.